
पावसाचा परतीचा प्रवास लांबणीवर
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम राहणार असून कोकण किनारपट्टी भागात पावसाचा परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागातील पाऊस कमी झाला आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वार्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचे सातत्य राहणार आहे. ही स्थिती 20 ऑक्टोबर पर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.