
आषाढी वारीच्या सोहळ्या दरम्यान १७ ते २५ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील ९ गावात संचारबंदी लागू
कोरोना परिस्थितीमुळे यंदाच्या आषाढी वारीच्या सोहळ्यादरम्यान १७ ते २५ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील ९ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात कडेकोट बंदोबस्त आणि व्यवस्था केल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
शंभरकर म्हणाले, राज्य शासनाच्या निर्णयानुसार यंदाच्या आषाढी वारीत कोरोनाविषयक नियम पाळून वारी सोहळा करण्यात येत आहे.
www.konkantoday.com