
रत्नागिरी शासकीय रूग्णालयात औषधाचा तुटवडा मात्र आरोग्यमंत्री म्हणतात औषधांचा भरपूर साठा
रत्नागिरी शासकीय रूग्णालयात ऍन्टीबायोटीक मल्टीव्हिटॅमीन, पेनकिलर व जेल याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून वेळोवेळी ही बाब पालकमंत्र्यांपासून अन्य लोकप्रतिनिधींच्या कानावर घालण्यात आली होती. मध्यंतरी डीपीडीसीमधून औषध खरेदी करिता ३ कोटींचा स्वतंत्र निधीही देण्यात आला होता. तरीदेखील औषधाची टंचाई अजूनही जाणवत आहे. यामुळे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी सभागृहात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामध्ये त्यांनी औषधाच्या तुटवड्याची नेमकी कारणे काय? याची सखोल चौकशी केली आहे का? नसल्यास याप्रकरणी शासनाने काही कार्यवाही केली आहे का अशी विचारणा केली. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रूग्णालयात आवश्यक तो औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगून ऍन्टीबायोटीकपासून कोणत्याही औषधाचा पुरेसा साठा असल्याचा संक्षिप्त खुलासा केला. त्यामुळे रूग्णालयाकडून चुकीची माहिती मंत्रीमहोदयांना पुरविली गेली की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत असून याबाबत आ. राजन साळवी हे या प्रश्नाबाबत सभागृहात अधिक चर्चेची मागणी करणार आहेत.
www.konkantoday.com