उद्योगमंत्री उदय सामंत यांना धमकी देणाऱ्या नरेंद्र जोशी यांना सामंत समर्थकांनी दिला “खास प्रसाद”,जोशी यांनी मागितली माफी

उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या नरेंद्र जोशी यांना सोमवारी राजापूर न्यायालयाच्या आवारातच काही लोकांनी खास प्रसाद दिला असल्याचे समजते .रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नरेंद्र जोशी यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मंत्री सामंत यांना जाळून टाकू, अशी धमकी दिली होती.
सोमवारी ते आपल्या कामासाठी राजापूर न्यायालयात आले होते. ही बाब समजल्यानंतर काही सामंत समर्थक तेथे गेले आणि त्यांनी जोशी यांना “खास प्रसाद” देऊन त्यांचा पाहुणचार केला, असे समजते. हा विषय समजताच राजापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर प्रकल्प विरोधकांची बाजू मांडताना जोशी यांनी सामंत यांना जाळून मारू असे खळबळजनक वक्तव्य केले होते त्यामुळे राज्यात तीव्र प्रतिसाद उमटले होते या वक्तव्याबद्दल जोशी यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे माझ्याकडून सामंत यांच्याबद्दल अपशब्द वापरले गेले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले
आम्हाला हा प्रकल्प नको असताना सरकार हा प्रकल्प लादत असल्याचे त्यांनी सांगितले आमचे म्हणणे ऐकून न घेता दडपशाही करत असल्याचेही त्यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button