मोबाईलची रेंज येत नसल्याने जिल्ह्यातील 257 गावांचा सर्व्हे

रत्नागिरी :  जिल्हा प्रशासनाने रेंज नसलेल्या गावांचा सर्व्हे केला असता 257 गावांची आतापर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल देण्यात आला आहे. या ठिकाणी बीएसएनएल टॉवर उभारण्यासाठी आता  संबंधित गावांमध्ये फोर -जी टॉवर बसविण्यासाठी जागा निश्चित करुन कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती बीएसएनएल विभागाच्या अधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. या कामाला लवकरच गती मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली. गेल्या आठवड्यात बीएसएनएल फोरजी टॉवर संदर्भात जिल्हाधिकारी दालनात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड व बीएसएनएल अधिकारी उपस्थित होते. आजही बर्‍याच गावांमध्ये अत्यावश्यकवेळी फोन लावायचा म्हटले तरी रेंजची समस्या असल्याने गावाच्या टोकावर किंवा ज्या ठिकाणी रेंज असेल तेथे जावून ग्रामस्थांना कॉल करावा लागतो. त्यामुळे आता गावागावातील ही समस्या मार्गी लावण्यासाठीच फोरजी टॉवर योग्य जागा निश्चित झाल्यानंतर बसविण्यात येणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना प्रशासनाने दिले आहे.  जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनीदेखील संबंधित विभागांना जागेसंदर्भात सर्व ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करण्यास
सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button