चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीत 34 जणांमध्ये आढळली कोरोनासद‍ृश लक्षणे

रत्नागिरी : चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या चाकरमान्यांच्या तपासणीत आरोग्य विभागाला 34 चाकरमान्यांमध्ये कोरोनासद‍ृश लक्षणे आढळून आली. त्याचवेळी दोन कोरोनाबाधितही सापडले आहेत.
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दरवर्षी हजारो चाकरमानी आपापल्या मूळ गावातील घरी येतात. यावर्षी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला 50 हजाराहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. जिल्ह्यात येणार्‍या या चाकरमान्यांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन कोरोनाबाधित तर 34 जणांमध्ये कोरोनासद‍ृश लक्षणे आढळून आली. आरोग्य विभागाकडून रेल्वे, एसटी बसस्थानकांसह महामार्गावर 21 ठिकाणी पथके तैनात ठेवण्यात आली होती. 29 ऑगस्टपर्यंत 32 हजार 261 चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यात रेल्वेने 10 हजार 633, एसटीने 3 हजार 529, खासगी ट्रॅव्हल्सने 2 हजार 924 आणि खासगी वाहनातून 2 हजार 924 प्रवासी आले. 30 ऑगस्टला सायंकाळपर्यंत दहा हजाराहून अधिक चाकरमानी गावागावात आले आहेत. कोरोना सदृश चाकरमान्यांची तपासणी आरोग्य विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. त्यामध्ये 22 जणांच्या आरटीपीसीआर तपासण्या केल्या. त्यात एकही बाधित सापडला नाही. अ‍ॅण्टीजेन तपासणीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 2 जण कोरोना बाधित आढळले. त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच 34 जणांना कोरोना सदृश्य ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली आहेत. प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो समूळ नष्ट झालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाच्या पथकाने दक्षता घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button