बेदरकारपणे रिक्षा चालवून दोन दुचाकींना धडक

रत्नागिरी:-बेदरकारपणे रिक्षा चालवून दोन दुचाकींना धडक देत अपघात केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना रविवार 21 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा.टीआरपी येथे घडली होती. नंदकुमार धोंडीराज रुक्के (52, रा.कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हवालदार नितीन जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,रविवारी रात्री नंदकुमार आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच- 08-एक्यु- 3379) घेउन हातखंबा ते रत्नागिरी असा येत होता.त्याच सुमारास आफताब आदम खान (53,रा. भाट्ये,रत्नागिरी) आपल्या ताब्यातील दुचाकी(एमएच- 08-एजे- 9943) आणि अमित अशोक शेठ (43, रा.नाचणे, रत्नागिरी)हा आपल्या ताब्यातील दुचाकि (एमएच- 08-एव्ही- 3878) घेऊन रत्नागिरी ते कुवारबाव असे जात होते. ही वाहने हॉटेल मराठा रेसीडन्सी समोर आली असता दारुच्या नशेत असलेल्या नंदकुमाने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात या दोन्ही दुचाकिंना धडक दिली.यात आफताब आणि अमित यांना दुखापत झाली असून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button