
कोकणातील नद्या गाळमुक्त होण्यासाठी विशेष पॅकेज द्या-आ.नीलेश राणे.
कोकणातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने पुढाकार घेऊन भरीव निधीची तरतूद करावी. नद्या गाळमुक्त करण्यासाठी कोकणाला विशेष पॅकेज द्यावे. यासह कोकणच्या विविध विकासात्मक प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधत भरीव निधीची मागणी आ.नीलेश राणे यांनी केली.राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. या अधिवेशनात बुधवारी राज्यपाल यांचे अभिभाषण झाल्यानंतर आ. नीलेश राणे सभागृहात कोकणाचे विकासात्मक प्रश्न मांडले. कोकणात सरसरी चार हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते.
सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. या ठिकाणच्या नद्या गाळाने भरल्याने पावसाळ्यात पुराची समस्या निर्माण होते. या नद्यांमधील गाळ काढण्याची काळाची गरज आहे. अन्यथा गाळाचा प्रश्न गंभीर बनेल, याकडे आ. राणे यांनी सरकारचे लक्ष वेधताना चिपळूण व राजापूरमधील पुराची उदाहरणे देत, कोकणातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी सरकारने कोकणासाठी विशेष पॅकेज द्यावे, बजेटमध्ये भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.