
रेल्वे प्रवासावेळी तरुणाची बॅग लांबवली
रेल्वे प्रवासादरम्यान तरुणाची बॅग लांबवून अज्ञाताने सुमारे 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना दि. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वा. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर घडली. याबाबत रोहन संतोष कांबळी (वय 19, रा. शिरीन पार्क डोंबिवली) याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी तो एलटीटी एक्स्प्रेसने प्रवास करत होता. रेल्वे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर थांबून पुढे जात असताना रोहनला आपली बॅग चोरीस गेल्याचे लक्षात आले. बॅगेमध्ये 61 हजार रुपयांचा आयफोन, कपडे, बूट व इतर साहित्य असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. अज्ञाताने रोहन झोपलेला असल्याची संधी साधत त्याची बॅग पळवली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत.