रत्नागिरी नगर परिषदेने 1 लाखांचे वीजबिल थकवल्याने स्वा. सावरकर नाट्यगृहाचे तोडले वीजकनेक्शन

रत्नागिरी : वीज बिल थकल्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहाचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तोडले आहे. त्यामुळे नाट्यगृह अंधारात आहे. मात्र पालिकेने तातडीने १ लाख बिल भरल्यानंतर पुन्हा वीज जोडण्यात आली. शहरातील स्ट्रीट लाईटचेही ३५ ते ४० लाखाचे वीज बिल थकीत आहेत. त्याबाबतही पालिकेला महावितरण कंपनीने नोटीस बजावली आहे. वीज पुरवठा सुरू नसल्याबाबत नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांनी महावितरणशी संपर्क साधला. यानंतर ही बाब समोर आली. १ लाख रुपयाचे थकीत बिल भरल्यानंतर महावितरण कंपनीने नाट्यगृहामध्ये पुन्हा विद्युत पुरवठा सुरू केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button