
मराठी माणसाच्या हक्काबाबत नेहमीच बोलणाऱ्या ठाकरे यांच्या सुरात पवारांनी सूर मिसळला
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासानंतर मिळणारे घर विकू नका. इथे मराठी पाळेमुळे कायम राहतील, त्यांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. या भागात मराठी टक्का टिकला पाहिजे. मराठीचा आवाज दिसला पाहिजे, अशा सूचक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील मराठी माणसाला रविवारी साद घातली. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईवरील मराठी माणसाच्या हक्काबाबत नेहमीच बोलणाऱ्या ठाकरे यांच्या सुरात पवारांनी सूर मिसळल्याचे चित्र दिसले.
www.konkantoday.com