दीड लाखांचे चोरलेले दागिने रत्नागिरी पोलिसांनी मिळवून दिले; चोरीतील जप्त मुद्देमालाचे वाटप
रत्नागिरी : 1 लाख 71 हजार 220 किमतीचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी संबंधिताच्या ताब्यात दिले आहेत. सायबर पोलिस ठाण्याकडून हस्तगत केलेले एकूण 40 मोबाईल हँडसेट मूळ मालकांना परत देण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे चोरीतील जप्त मुद्देमालाच्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मुद्देमाल परत मिळविण्यासाठी ज्या पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी मेहनत घेतली त्यांचे कौतुक केले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक तथा पोलिस उपअधीक्षक (गृह) मारुती जगताप, पोलिस निरीक्षक स्थागुशा शहा, पोलिस निरीक्षक विनित चौधरी, पोलिस निरीक्षक शिरीष सासणे, सहा. पोलिस निरीक्षक नितीन पुरळकर उपस्थित होते.