४ मोठ्या बंदरांसह कोकण किनारपट्टीवरील २० मासळी उतरवण्याच्या केंद्रांचा विकास केला जाणार

कोकणातील आठ प्रमुख बंदरांसह ५९ मासळी उतरवण्याच्या केंद्राचा विकास करण्याची सरकारची योजना आहे. यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये ४ मोठ्या बंदरांसह कोकण किनारपट्टीवरील २० मासळी उतरवण्याच्या केंद्रांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन बंदरे व ११ केंद्रे आणि सिंधुदुर्गमधील सहा केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै आणि साखरीनाटे तर रायगड जिल्ह्यातील भरडखोल, जीवना या चार मोठ्या बंदरांचा समावेश आहे. रत्नागिरीतील आंबोळगड, हेदवी, बुधाळ, पालशेत, असगोली, दाभोळ, पाजपांढरी, आंजर्ले, केळशी, वेसवी, बाणकोट तर सिंधुदुर्गातील शिरोडा, कर्ली, देवली, देवबाग, दांडी मकरेबाग, तारामुंबरी या मत्स्य केंद्रांचा विकास होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button