
रघुवीर घाटात कोसळली दरड
खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणार्या रघुवीर घाटात मंगळवार दि. 19 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रघुवीर घाटाच्या पलिकडच्या कांदाटी खोर्यातील 21 गावांचा संपर्क तुटला असून, सार्वजनिक बांधकाम विभागा माध्यमातून या ठिकाणी एक जेसीबी व बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता श्रीमती आशा जाटाळ यांनी दिली.
रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे शिंदी, वळवण, उचाट, मोरणी, म्हाळुंगे, सालोशी, खांदाट, वाघावळे, लामज, निवळी, परबत, बन, चकदेव, आकल्पे सह अन्य गावांकडे जाण्याचा मार्ग सद्यस्थितीत बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रघुवीर घाटात ज्या ठिकाणी धोकादायक दरड किंवा अतिवळणे आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावरील रस्त्यालगत घळी निर्माण झाल्या आहेत. त्या ठिकाणी गेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षित करण्याचे काम गेले काही दिवस सुरू
होते.
मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा घाट दि. 1 जुलै पासूनच दोन महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आला आहे. पर्यटक जावू नयेत, यासाठी या घाटाच्या पायथ्याशीच पोलिसांनी बॅरिकेटींग देखील केलेले आहे. त्यामुळे या दरडीमुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.