
भविष्यात चाचणीला विरोध दर्शविणार्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल टाकणार
ब्रेक दि चेनच्या चौथ्या टप्प्यात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी दर कमी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामस्तरावर कडक धोरण अवलंबले आहे. गावागावांत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांशी संवाद साधून त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. भविष्यात या दरम्यान चाचणीला विरोध दर्शविणार्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल टाकले आहे.
राज्यात अनलॉकच्या पद्धती जाहीर झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा ४ थ्या टप्प्यात असून पॉझिटिव्हिटी रेट १४.१२ टक्के आहे. तो कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढवली आहे.
www.konkantoday.com