नारायण राणेंना निवडून आणायचे आहे. मी बिलकुल नाराज नाही-किरण सामंत

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे आणि महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठीच मी वरिष्ठांशी चर्चा करून माघार घेतली. कार्यकर्त्यांना दोन दिवसांत सूचना देऊ. नारायण राणेंना निवडून आणायचे आहे. मी बिलकुल नाराज नाही. नाराज असतो तर आलो नसतो. मला वरिष्ठांनी आश्वासन दिलेले नाही, परंतु कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत असे प्रतिपादन लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार किरण सामंत यांनी केले आहेते म्हणाले की, ही जागा शिवसेनेला मिळाली असती तर बरं झालं असतं. कोकणात शिवसेना रुजली होती. मालवण व कुडाळमधील कार्यकर्ते काम करणार नाहीत, असे माझ्या कानावर आले. परंतु सर्वांशी संवाद साधून ते काम करतील. काहींनी राजीनामे दिले आहेत, यावर ते म्हणाले की, नाराजी राहणार परंतु दोन दिवसांत नाराजी दूर करू, सर्व शिवसैनिक कामाला लागतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात निवडून द्यायचे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये धनुष्यबाण नाही या प्रश्नावर भैय्या म्हणाले की, कोकणी जनता धनुष्यबाण कधीच विसरणार नाही. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत धनुष्यबाण दिसेल. एकनाथ शिंदे यांना फसवले जात आहे, असा आरोप होतोय, या प्रश्नावर हा फक्त आरोप आहे, यात तथ्य नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. शक्तीप्रदर्शनावेळी प्रमोद जठार, अतुल काळसेकर, बाळ माने, राजन तेली यांच्यासमवेत अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button