
उदय सामंत शिंदे गटात गेल्याने शिवसेनेचे होणारं नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामील झाल्यामुळे सांमतापेक्षा स्थानिक शिवसेनेला राजकीयदृष्ट्या मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत उदय सामंत यांचे वर्चस्व राहिले असून शिवसेनेतील दुसरं नेतृत्वच निर्माण झालेले नाही. त्यामुळे स्वतंत्र गटात सामंतांनी प्रवेश केला, तरीही रत्नागिरीतील त्यांच्या वर्चस्वाला तेवढा धक्का बसेल, असे नाही. उलटपक्षी शिवसेनेचे मोठे नुकसान होणार आहे.
रत्नागिरी मतदारसंघात सामंत यांचे वर्चस्व आहे पक्षापेक्षा सामंत यांना मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरें राहण्याचे मान्य केले असले तरी अद्यापही कार्यकर्त्यांची द्विधा मन स्थिती आहे त्यामुळे अनेक जण उघड भूमिका घेऊ शकत नाहीत
त्यामुळे सामंत कुठेही गेले तरी त्यांचे वर्चस्व कमी होण्याची शक्यता दिसत नाही असे असताना सामंत यांनी एका व्हिडीओद्वारे आपण अजूनही शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट केले आहे घटक पक्षांकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होत असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे
www.konkantoday.com