30 ठिकाणचा गाळ काढल्यास चिपळूणची पूरस्थिती आटोक्यात, प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला अहवाल

चिपळूण : अतिवृष्टीमुळे सातत्याने चिपळूण शहरासह लगतच्या गावात पूर येत आहे. यावर्षी तर महापूर आल्याने शहर उद्ध्वस्त झाले. चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी वाशिष्ठी नदीतील 30 ठिकाणचा गाळ काढणे गरजेचे असल्याचा अहवाल प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना दिला आहे. त्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
आता आमदार, वरिष्ठ अधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे गाळ उपसा सुरू झाला आहे. या कामाला गती देण्यासाठी लोकसहभाग देण्याचे आवाहन प्रांताधिकारी पवार यांनी केले आहे.
महापुराने अनेक नागरिकांचा संसार वाहून गेला. त्यामुळे याची कारणे शोधण्यात प्रशासन गुंतले आहे. त्यानुसार वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ हे महापुराचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button