आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी ः समृद्ध कोकणची मागणी

रत्नागिरी ः कोकणातील आंबा बागायतदार यावेळी अडचणीत सापडला असून यावर्षी आंब्याचे उत्पादन फक्त ४० टक्केच झाले आहे. यासाठी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी समृद्ध कोकण संघटनेच्यावतीने करण्यात आली. आंबा बागायतदारांच्यावतीने कृषीमंत्री अनिल गोंडे यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर एक बैठक झाली. यावेळी २०१४ ला भरपाईचा जीआर निघूनही भरपाई मिळाली नसल्याचे कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button