पावसाची हुलकावणी! पाणीटंचाईग्रस्त वाड्यांमध्ये वाढ

रत्नागिरी : हुलकावणी देणार्‍या पावसामुळे पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढच होत निघाली आहे. सध्या 90 गावातील 188 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तब्बल 40 हजार ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मात्र, अजूनही मान्सून स्थिर झालेला नाही. गेले तीन दिवस पावसाने दडी मारली आहे.  आतापर्यंत सुमारे तेराशेहून अधिक टँकरच्या फेर्‍यांद्वारे लाखो लिटर पाणी 188 वाड्यातील लोकांना पुरवले गेले. उन्हामुळे बाष्पीभवन अधिक झाल्यामुळे विहिरींची पाणी पातळी खालावली, नद्या-नाल्यांची पात्रे कोरडी पडली. परिणामी मे  महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याची चणचण जाणवू लागली.
गतवर्षी 67 गावातील 113 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यंदा त्यात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला असला तरीही अजून नद्या, नाल्यांना पुरेसे पाणी आलेले नाही. त्यामुळे अजूनही अनेक भागांमध्ये टँकरने पाणी द्यावे लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button