
रत्नागिरी जिल्ह्यातील 273 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
रत्नागिरी : जिल्ह्यातील तब्बल 273 ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि. 4 ते 6 जून दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करायचा आहे. यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर 7 जून रोजी आरक्षण सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करायचे आहे. त्यानंतर 7 ते 10 जूनपर्यंत आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ग्रामस्थांना मुदत देण्यात आली आहे. दि. 15 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन त्यावर आपला अभिप्राय नोंदवायचा आहे. त्यानंतर 17 रोजी प्रांताधिकार्यांनी जाहीर केलेले अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेला जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत.
जिल्ह्यात मंडणगडमध्ये 16, दापोली 34, खेड 17, गुहागर 26, चिपळूण 33, संगमेश्वर 39, रत्नागिरी 33, लांजा 34 व राजापूर तालुक्यात 41 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत होणार आहे. राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे.