जिल्ह्यातील 10 न्यायाधीशांच्या बदल्या

रत्नागिरी : जिल्ह्यातील  10 न्यायाधीशांचा रत्नागिरी जिल्ह्यामधील कालावधी पूर्ण झाल्याने बदल्या झाल्या आहेत. जिल्हा मुख्यालयाहून बदली झालेल्या न्यायधीशांना प्रधान जिल्हा तसेच सत्र न्यायाधीश  एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या उपस्थितीत  निरोप देण्यात आला.  यावेळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश  एम. क्यू. एस. एम. शेख आणि  जिल्हा  न्यायाधीश एल. डी. बिले  यांनी  मनोगत व्यक्त केले. बदली झालेल्या न्यायाधीशांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी इतर न्यायाधीश उपस्थित होते. प्रास्ताविक सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर नितीन पाटील यांनी केले. बदली झालेले न्यायाधीश  दिवाणी न्यायाधीश तथा सचिव आनंद सामंत यांची नागपूर येथे बदली झाली असून त्यांनी चार वर्षापेक्षा जास्त काळ रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कामकाज पाहिले. महाराष्ट्र राज्यात सर्वोत्कृष्ट विधी सेवा प्राधिकरण 2018- 19 या कालावधीत निवड त्यांच्या कामकाजाच्या कालावधीत झाली होती. त्याचप्रमाणे मुख्य न्यायदंडाधिकारी  जी. जी. इटकर यांचीही बदली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, नागपूर या ठिकाणी झाली असून, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन. सी. पवार यांची (बालापूर) अकोला,  एस. एस. मटकर यांची यवतमाळ, आर. एस. गोसावी यांची (माजलगाव) बीड आणि  पी. एस. गोवेकर यांची (परतूर) जालना येथे बदली झाली आहे. त्यामध्ये तालुक्यातील इतर 4 न्यायाधीशांच्या बदल्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button