मुरूडच्या पर्यटनावर परिणाम; पर्यटकांवर कारवाई सत्र

दापोली : राजकीय वादात सापडलेल्या साई रिसॉर्टमुळे मुरूड किनार्‍यावरील पर्यटकांवर सध्या कारवाईचे सत्र सुरू आहे. हा वाद साई रिसॉर्टशी असला तरी यांची झळ मात्र मुरुड येथील पर्यटन व्यावसायिकांना बसली आहे. अनेक गुंतवणूकदार पर्यटन व्यवसायिकांनी मुरूडकडे पाठ फिरवली आहे. पर्यटनातून होणारी उलाढाल थांबली असून पर्यटन वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. सततच्या कारवाईबाबत येथील पर्यटन व्यावसायिकांनमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. राज्यात दापोलीतील मुरूड येथील पर्यटनाची चर्चा अधिक आहे. सेफ पर्यटन म्हणून अनेक पर्यटक या किनार्‍याला पसंती देतात तर येथे पर्यटन व्यवसाय उभारावा म्हणून अनेकजण येथे गुंतवणूक करण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र, येथील सततची कारवाई आणि ईडीचा ससेमिरा यामुळे जवळपास 100 हून अधिक गुंतवणूकदारांनी आपली कोट्यवधींची गुंतवणूक काढून घेतली आहे. ना. मंत्री अनिल परब यांचे हे  कथित साई रिसॉर्ट असून हे बेनामी मालमत्तेतून बांधण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. त्या ठिकाणी ‘सीआरझेड’चे उल्लंघन झाले आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला असून दोन वर्षापासून हे रिसॉर्ट तोडण्यासाठी सोमय्या पाठपुरावा करत आहेत. मात्र, या वादात येथील सामान्य पर्यटन व्यावसायिक भरडला जात असून भाजपाबाबत आणि  माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button