रत्नागिरी विमानतळाच्या वाढीवसाठी जागेचे सुरु असलेले भूसंपादन प्रक्रियेला मिरजोळे वासियांचा विरोध

रत्नागिरी विमानतळाच्या वाढीवसाठी जागेचे सुरु असलेले भूसंपादन प्रक्रिया पूर्णत: बेकायदेशीर असून याला मिरजोळेतील रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे.त्यामुळे रत्नागिरी विमानतळावरून विमान सुरू होण्याचे स्वप्न लांबणीवर पडणार आहे

याबाबतचे निवेदन मिरजोळे वासियां कडून मंगळवारी प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले. वेळप्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी या ग्रामस्थांनी केली आहे.
मिरजोळे येथील ग्रामस्थांच्या यापूर्वीच विमानतळ, एमआयडीसी, कोकण रेल्वे महामंडळ, शीळ धरणासाठी जमिनी संपादीत केलेल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या जमिनींमध्ये मिरजोळे ग्रामस्थांची घरे, शेती व बागायती असल्याने यापुढे कोणत्याही कारणास्तव मिरजोळेतील जमिनींचे संपादन करु द्यायचे नाही असा निर्णय येथील काही ग्रामस्थांनी घेतला आहे.
विमानतळाच्या वाढीव कामासाठी यापूर्वी कोस्टगार्डने जागा मागितली होती. त्यालाही मिरजोळेवासियांनी विरोध केला होता. विमानतळ वाढीव कामासाठी आता पुन्हा जागांचे संपादन केले जात आहे. शिरगाव तिवंदेवाडीतील ग्रामस्थांनी यासाठी तयारी दर्शवली आहे. त्यांच्या सुनावण्यापूर्ण झाल्या आहेत. परंतु मिरजोळेवासियांच्या सुनावण्या सुरु आहेत. मंगळवारी प्रांताधिकार्‍यांना याबाबतचे निवेदन देऊन मिरजोळेतील ग्रामस्थांनी आपली भुमिका त्यांच्यासमोर स्पष्ट केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button