
23 डब्याच्या तुतारीला १५ सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ,कायम स्वरूपी सुरु करण्याची मागणी
मुंबई दि.-गणेशोत्सव दरम्यान 22 ऑगस्ट पासून सुरु झालेली 23 डब्याची दादर -सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला 15 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.ही 23 डब्याची गाडी कायमस्वरूपी सुरु करावी अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सव दरम्यान 8 डबे वाढवून 10 सप्टेंबर पर्यंत सुरु झालेली 23 डब्याची तुतारी एक्सप्रेस कायम स्वरूपी सुरु करावी आणि वातानुकूलित डब्यात वाढ करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा विविध रेल्वे संघटनांनी दिला आहे.
www.konkantoday.com