कोयनेचे अवजल मुंबईला जाणार ३८ कोटी रुपये खर्च करून हवाई सर्व्हेक्षण पूर्ण.

कोयना धरणातून बाहेर पडणारे ६८ टीएमसी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरवून उर्वरित पाणी मुंबईत वळविण्यासाठी आवश्यक हेलिकॉप्टरद्वारे हवाई सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. तब्बल ३८ कोटी रुपये या सर्वेक्षणासाठी खर्च आला असून, व्हॅसकॉम कंपनीने हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. याचा अहवाल कंपनी राज्य सरकारला देणार आहे. यानंतर कोयनेचे अवजल १६० कि.मी.च्या पाईपलाईनद्वारे मुंबईत वळविले जाणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद राज्य सरकारला करावी लागणार आहे.वीजनिर्मितीनंतर कोयना धरणातील सुमारे ६८ टीएमसी पाणी चिपळूणमधील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाते.

वाहून जाणारे हे पाणी सुमारे १६० कि.मी. अंतरावर असलेल्या मुंबईत जलवाहिन्यांमधून आणण्याचा प्रस्ताव आहे. हे पाणी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ शहराला देण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. पाणी मुंबईपर्यंत आणायच झाल्यास मुंबईहून कोकणापर्यंत जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गाप्रमाणे पाईपलाईन टाकल्यास पाईपलाईन टाकण्यासाठीचा खर्च कमी होणार आहे.सर्वेक्षणासाठॅ ३८ कोटी रुपये खर्चकोयना अवजल मुंबईला नेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कंपनीला सर्वेक्षण करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. कंपनीने दिलेल्या मुदतीपूर्वी आपले सर्वक्षणाचे काम पूर्ण केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button