परशुराम घाट रस्ता रुंदीकरण 25 एप्रिल ते 25 मे दरम्यान दुपारी 11 ते 5 कालावधीत वाहतुक बंद

रत्नागिरी दि. २२ : नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन घातलेल्या अटींची पूर्तता करण्याच्या कार्यवहीनंतर परशुराम घाट रुंदीकरणाचे काम 25 एप्रिलपासून 25 मे 2022 पर्यंत घाटात साधारणपणे दुपारच्या वेळात दुपारी 11 ते दुपारी 5 वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

        या कामाला गती देवून पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे तसेच आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारणे यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालेल.

        काम सुरु करण्यापूर्वी घाटासह चिपळूण ते आंबा घाट आणि खेड ते पनवेल याबाबतची माहिती फलक लावून द्यावी असे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील म्हणाले. घाटात काही वळणांवर अपघात होण्याचा धोका आहे, त्या ठिकाणी गतीरोधक आवश्यक आहे. त्याची उभारणी करा अशा सूचना डॉ. पाटील यांनी दिल्या.

        नेमके कोणत्या वेळात वाहतूक बंद ठेवायची याचा निर्णय आगामी 2 दिवसात घेतला जाणार आहे.

        या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस परिवहन आदि विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button