
कोकण विभागात एसटीची पन्नास टक्के वाहतूक सुरू; एसटीचे सुमारे 5 हजार कर्मचारी हजर
रत्नागिरी : कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील एसटी आगारांत मिळून 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर झाले आहेत. 50 टक्क्यांहून अधिक एसटी वाहतूक सुरू झाली आर्हेें अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाने दिली. 28 ऑक्टोबर 2021पासून राज्यातील जवळपास 92 हजार एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली होती. दि. 8 एप्रिल 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 425, रायगड जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 644, रत्नागिरी जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 125 आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत 716 कर्मचारी संप सोडून कमावर हजर झाले आहेत. कोकणात लवकरच शंभर टक्के एसटी वाहतूक सुरू होईल, असे आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.