ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या,ग्रामीण भागात सिलिंडरसाठी लागतात एक हजार रुपये

महागाईने अक्राळविक्राळ स्वरूप धारण करीत हातावर पोट असलेली सर्वसामान्य जनता व मध्यमवर्गीयांना जगणे मुष्किल केलेले असताना केंद्र व राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष जीवघेण्या महागाईवर मौन पाळून असल्याने सामान्य जनता गलितगात्र झालीआहे. गेल्या सात वर्षात ४१० रूपयांवरून घरगुती सिलेंडरचे दर ९६० रूपयांवर पोहोचले आहेत. त्यात ग्रामीण भागात तर सिलिंडर घरपोच करण्यासाठी एक हजार रुपये लागत आहेत. त्यामुळे पुन्हा चुल पेटवून स्वयंपाक करणे अधिक परवडणारे असल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button