अशा षंढा बाबत काहीही बोलण्याची गरज नाही -जयंत पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

नवरा,बायको,पाहुणे अश्या बिरुदावल्या आमच्यातल्या सगळ्यांना देणाऱ्या षंढा बाबत काहीही बोलण्याची गरज नाही. कारण, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात.सुजय विखे पाटलांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिपळूणमध्ये टीका केली
सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांची तिखट प्रतिक्रिया व्यक्ती केली
तसेच महाविकास आघाडी कोणावरही दबाव टाकत नाही आमच्या सहकार्‍यांवर वेगवेगळे एजन्सी येतात आणि आमच्या सरकार मधल्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम चालू आहे भारतीय जनता पक्ष आणि वेगवेगळे एजन्सी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे
महाराष्ट्राचे सरकार पाडण्यासाठी साम दाम दंड त्याचा उपयोग केला जातो चित्रपट येतात आणि जातात,पण देशाच्या प्रामुख्याने एखादा चित्रपट खांद्यावर घावा ,त्याचा प्रचार करावा आणि त्याचं मार्केटींग करावं हे सगळं अनाकलनीय – काश्मीर फाईल च्या माध्यमातून देशात सामाजिक तेढ निर्माण करण्याच काम पंतप्रधान करत असल्याचे जयंत पाटील यांच वक्तव्य केले
7 वर्षे सत्ता भोगूनही तुम्हाला काश्मीर फाईल च्या निर्मात्याच्या पायाशी का जावं लागतं असा सवाल जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांनी उपस्थित केला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button