ग्रामीण स्तरावरील बेरोजगारांनी एकत्र येणे ही काळाची गरजः संजय पुनसकर

रत्नागिरीः रत्नागिरी तालुक्यातील विविध शाखेतील बेरोजगारांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची वेळ आली आहे.त्यासाठी नोंदणीकृत महाराष्ट्र समविचारी मंच प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी केले आहे.
विविध शाखा अंतर्गत पदवीधर तांत्रिक शाखेच्या उमेदवारांच्या संपर्क अभियानात ते बोलत होते.जिल्ह्यात एक नवीन प्रकल्प आलेला नाही.जे आहेत त्यात कंत्राटी पद्धतीने अल्प वेतनावर राबविले जाते.स्थानिक भूमीपुत्रांना न्याय नाही.ही पद्धती बदलण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांनी समविचारीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन आपली ताकद निर्माण करावी असे आवाहन पुनसकर यांनी केले.
समविचारीचे राज्य सहचिटणीस मनोहर गुरव यांनी बेरोजगार आणि शासकीय पदभरतीतील दिरंगाई यावर कडाडून टीका केली.बेरोजगारांनी समविचारी समवेत एकत्र यावे असे सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस आनंद विलणकर,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, सौ.अंजली वाघाटे,सौ.जान्हवी कुलकर्णी,सौ.साधना भावे यासह मुख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामीण जनसंपर्क करण्याचा मनोदय अनेकांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button