
पावसाने विश्रांती घेताच परशुराम घाटात अर्धवट राहिलेले काम सुरू करण्यासाठी यंत्रणेची धावपळ.
गेले आठ दिवस मुसळधार कोसळणार्या पावसाने मंगळवारपासून विश्रांती घेतल्यानंतर बुधवारपासून अर्धवट राहिलेल्या कामांच्या ठिकाणी यंत्रसामुग्रीची धडपड पुन्हा सुरू झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात गॅबियन वॉलसह लोखंडी जाळी बसविण्याच्या कामानी पुन्हा वेग घेतला आहे. येत्या काही दिवसात ही कामे मार्गी लावण्यासाठी ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग विभागाची धडपड सुरू झाली आहे.मान्सूनपूर्व पावसाने १९ जूनपासून हजेरी लावल्याने ठिकठिकणची सुरू असलेली विकास कामे जागच्या जागी ठप्प झाली होती. परशुराम घाटात धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसविली जात आहे. लोखंडी जाळी बसविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात येऊन ते पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र अचानकपणे पाऊस सुरू झाल्याने घाटातील कामांना ब्रेक लागला होता.www.konkantoday.com