
माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उबाठाचे उमेदवार?
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत विद्यमान तालुकाप्रमुख, माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. रविवारी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना नेत्यांनीही साळवी यांना उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे बंड्या साळवी उबाठाचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता वाढली आहे.गेली १५ वर्षे रत्नागिरी तालुक्याचे तालुकाप्रमुख म्हणून काम करताना बंड्या साळवी यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवला होता. राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार उदय सामंत असतानाही साळवी यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती बहुमताना शिवसेनेच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते. त्यानंतर ना. सामंत हे शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही निवडणुकीत प्रचाराची रणनिती आखण्याचे काम साळवी यांनी केले होतेे.www.konkantoday.com