त्यामुळेच मी विद्यार्थ्यांच्या आवडीचा मंत्री झालोय -उदय सामंत

परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करणारा मंत्री म्हणून माझी राज्यातील घराघरात ओळख निर्माण झाली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणून माझ्याकडे एक ही व्यक्ती पाहत नाही, असं उदय सामंतांनी म्हटलं आहे.हे म्हणताना त्यांचा सूर हा मिश्किल होता. पण विद्यार्थ्यांना या मानसिकतेतून बाहेर काढायला हवं आणि यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यायला हवा, असं आवाहन सामंतांनी केलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये खासदार श्रीरंग बारणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामंतांनी ही बाब अधोरेखित केली. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे मंत्री सामंत घराघरात पोहोचले. असे गौरवोद्गार शिवसेना नेते सचिन अहिरांनी काढले.
हाच धागा धरून सामंत म्हणाले पण मला घराघरात नेमकं कशामुळे ओळखू लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात मी विविध कार्यक्रमांसाठी जातो. तेंव्हा मंचावरील खुर्चीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री बसला म्हणून मला एक ही जण ओळखत नाही. तर परीक्षा रद्द करून, विध्यार्थ्यांना पास करणारा हा मंत्री आला अशी माझी प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळेच मी विद्यार्थ्यांच्या आवडीचा मंत्री झालोय,असं म्हणताना सामंतांचा मिश्किल सूर होता, त्यामुळे सभागृहात देखील हशा पिकला.
पण ही भावना चुकीची आहे, त्यामुळे विध्यार्थ्यांना त्या मानसिकतेतून बाहेर काढायला हवं. यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी पुढाकार घ्यायला हवा. असं आवाहन सामंतांनी केलं
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button