कन्याकुमारीची नौका बिघाड झाल्याने मिऱ्या बंदरात

रत्नागिरी : मिऱ्या बंदरात आलेल्या कन्याकुमारी येथील परप्रांतीय नौकेला तटरक्षक दलाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या परराज्यातील यांत्रिकी नौकेचे नाव जॉफी (आयएनडी – टीएन – १५ एमएम – ७२४८) असे आहे. ही नौका पकडल्यानंतर मच्छिमारांनी तत्काळ मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तपासणीनंतर या नौकेत बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने या नौकेची दुरुस्ती करण्यास परवानगी दिली आहे. तीन दिवसांपूर्वी मिर्‍याबंदर येथे ही परप्रांतीय नौका आली असल्याची माहिती ग्रामस्थांनी सहायक मत्स्य व्यवसाय विभागाला दिली. त्यानंतर तिची चौकशी अधिकाऱ्यांनी केली. स्टिअरिंग मध्ये बिघाड झाल्याने ही नौका मिऱ्या बंदरात आल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button