पावसाळ्यात “शीळ” धरणाच्या पाण्याचा साठा करुन “पानवल” धरणातुन पाणी पुरवठा करावा,. राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निलेश भोसले आणि मिलिंद किर यांचे न. प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…

“रत्नागिरी शहरासाठी पावसाळ्यात “शीळ” धरणाच्या पाण्याचा साठा करुन “पानवल” धरणातुन पाणी पुरवठा करावा; जेणे करुन रत्नागिरीकराना १२ महिने २४ तास पाणी उपलब्ध होइल” अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष निलेश भोसले आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी न. प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कीरत्नागिरी शहरामध्ये सुधारीत नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. सदर नळपाणी योजना ही सन २०१६ मध्ये मंजूर झाली मात्र ती टेंडर होवून वर्क ऑर्डर देण्यासाठी सन २०१७ उजाडले. सन २०१६ ते २०२४ अशी सुमारे ८ वर्षे झाली मात्र अजूनही नळपाणी योजना अपूर्ण आहे. ही दुर्दैवी बाब आहे. सदर योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षे असताना कॉन्ट्रक्टर चे लाड पुरवण्याचे काम नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी केले हे सर्व नागरीकांना माहितच आहे. म्हणून लोकांना आज एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजन करावे लागले. गेली काही वर्षे लोकांना पाणी बाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. मात्र नगरपरिषदेने ज्या कॉन्ट्रक्टरची नियुक्ती केली. तो नॉन कॉलीफायर कॉन्ट्रक्टर ज्याने अशा प्रकारचे काम यापूर्वी कधीच केले नाही. त्याबाबत खोटे दस्तऐवज तयार करुन कॉलीफाय होण्यासाठी खोटी प्रमाणपत्र दाखल केली.त्याबाबत संबंधीत ठेकेदाराच्या विरुध्द नगर परिषदेने ठेका देण्यापूर्वी संबंधीतांना नगर परिषदेच्या लक्षात आणून दिले होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने तोच कॉन्ट्रक्टर नेमायचे हे ठरविले होते म्हणून आज नगर पालिकेची सुधारीत नळपाणी योजना निकृष्ट दर्जाची झाली आहे. तरी सदर कामापैकी पानवल धरण ते नाचणे फिल्टर प्लांट, शिळ धरण ते जॅकवेल पाईप लाईन ही कामे झाली नाहीत. पानवल ते नाचणे फिल्टर हाऊस पर्यंतची १३०० मीटरची पाईप लाईन अद्याप जुळली न गेल्यामुळे या पुढील वर्षीही लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ नगर पालिका प्रशासन आणि राज्याचे सत्ताधारी पुन्हा आणणार आहे. गेल्या आठ वर्षात १३०० मीटर लाईनची तरतुद आपण प्रशासक म्हणून केली नाही. सदर योजना ही २४ x ७ ( २४ तास दररोज ) जनतेला पाणी देण्याचे नियोजन केलेले असताना लोकांना अद्याप २४ तास पाणी देण्यात आले नाही ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या वर्षीही माझी मागणी होती मी तसे निवेदनही आपणास दिलेले आहे आणि आपण व श्री. भोईर यांच्या बरोबर झोन प्रमाणे पावसाळ्यामध्ये २४ तास पाणी जनतेला देण्याचे सुचीत केले होते, आपण त्याला मान्यताही दर्शविली होती. मात्र आपण पालक मंत्री व त्यांचे भाऊ किरण सांमत यांच्या सांगण्यावरुन आपण जनतेला २४ तास पाणी देण्यापासून वंचित ठेवले का ? असा प्रश्न मला व जनतेला पडला आहे.तरी या वर्षी पावसाळयात २४ तास जनतेला पाणी द्यावे जेणेकरुन पाण्याची बचत होईल. पानवल धरणाचे १३०० मीटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन योजनेच्या नियोजना प्रमाणे पावसाळयात शिळ धरणाचे पाणी स्टोअर करुन पानवल धरणाचे पाणी पावसाळयात वापरावे व सहकार्य करावे अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button