
तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांचे रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी मंगळवारी केले सांतवन
रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी तीवरे गावातील उध्वस्त झालेल्या कुटुंबियांची मंगळवारी पुन्हा भेट घेतली तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांबरोबर एक बैठक घेतली.
पालकमंत्र्यांनी पिडीत कुटुंबियांना त्याच ठिकाणी घरे बांधून पुनर्वसन करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. दुघॅटनाग्रस्तांची दुसरीकडे पुनर्वसन करण्याची इच्छा असेल तर तसे करू शकतो, परंतु त्यास थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांची जमीन, शेती सर्व काही इथेच असल्यामुळे गावातच त्वरित पुनर्वसन करणे शक्य होईल. पुनर्वसन करताना निधीची कमी पडू दिला जाणार नाही.
पुनर्वसन करताना दुघॅटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाची मुलभूत सोयी-सुविधा असलेली घरे बांधून देण्यात येतील.
या दुर्घटनेत उध्वस्त झालेले साकव, पूल, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, कुपनलिका, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्वांची नव्याने बांधणी व दुरुस्ती तात्काळ करणे गरजेचे असून आजूबाजूच्या गावांशी तुटलेला संपर्क सुरळीत करण्याकरिता रस्ते लवकरात लवकर बनवण्यात येतील.
तुटलेल्या विजेचे खांब पून्हा नव्याने उभारून त्यावरून विजेचे कनेक्शनही तात्काळ देण्यात येतील. ज्यांची गाई तसेच गुरेढोरे वाहून गेले असतील त्यांना ती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
पुनर्वसन व अन्य समस्ये संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याची ग्रामस्थांची विनंती मान्य करीत, ही बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
दुघॅटनाग्रस्त कुटुंबांना ५०० चौरस फुटाचे घर मिळवून द्यावे अशी दुघॅटनाग्रस्तांनी केलेली मागणीही पालकमंत्री वायकर यांनी मान्य केली.
पालकमंत्र्यांनी बेघर झालेल्या दुघॅटनाग्रस्तांना त्वरित तात्पुरती शेड उभारून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निदेॅश दिले.
धरण फुटून वाहून गेलेल्या एका कुटुंबातील रुद्र नावाच्या छोट्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च वयाची १८ वर्ष पुर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा कायॅकताॅ म्हणून करण्याचे वचन दिले. तिच्या नावे रक्कम बँकेत ठेऊन त्यावर येणाऱ्या व्याजातून तिचा शिक्षणाचा खर्च भागवला जाईल.
या ठिकाणी नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरीता सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला जाईल असेही पालकमंत्री म्हणाले.
या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाना आधार देण्या बरोबर कुटुंब पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पालंत्री वायकर यांनी १९ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
तत्पूर्वीच पालकमंत्री वायकर यांनी जिल्हाधिकारी समवेत जिल्ह्यातील पुनर्वसन कार्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा तसेच दुघॅटनाग्रस्तांना करण्यात येत असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला.
या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री सुनील चव्हाण, आमदार श्री सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, तिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
www.konkantoday.com