
बाणकोट-राजापूरपर्यंत किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आराखडा मंजूर होणार
रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज विधान परिषदेतील माझ्या तारांकित प्रश्वावर दिली.
बाणकोट ते राजापूरदरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कोकण ग्रामीण पर्यटन विकास समितीच्या आगामी बैठकीत प्रस्ताव सादर करुन मान्यता मिळाल्यावर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ६५० लाईफ जॅकेट खरेदी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून किनाऱ्यावर वॉच टॉवर्स उभारण्यात आले असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 700 ते 800 कोटींचा विकास आराखडा प्रलंबित आहे. या आराखड्याच्या मंजूरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करून आराखडा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.आमदार निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न आज विधिमंडळात विचारला.