उपोषण सरकारने आणलेल्या कायद्याच्या विरोधात, वीजपुरवठा मात्र सरकारी कार्यालयातून

राज्य सरकारने लागू केलेल्या सागरी मासेमारी नियमन कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्ससीन नेट मच्छीमारांच्या मंडपाला चक्क सरकारी कार्यालयातून वीजपुरवठा होत असल्याचा प्रकार पारंपारिक मच्छीमारांनी आज उघडकीला आणला आहे आंदोलकांच्या मंडपात सरकारी मीटरमधून वीज दिल्याचे पारंपरिक मच्छिमारांनी उघडकीस आणताच महावितरणच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेअखेर वीजचोरी झाल्याची कबुली देत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जोडलेली वीज वाहिनी तोडून टाकली.
ज्या मीटरमधून वीज जोडणी घेतली होती तो वीज मीटर कांदळवन विभागाचा असल्याचे पुढे आले. कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करताच आमच्याकडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वीज घेतल्याचे कांदळवनच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर महावितरणचे अधिकारी आणखीनच अडचणीत आले
पारंपारिक मच्छिमारांनी उग्ररूप दाखवताच महावितरणचे अधिकारी कौस्तुभ वसावे यांनी आपली चूक कबूल केली. एका नगरसेवकाने सांगितल्याने आपण वीज जोडणी केल्याचे त्याने सांगितले .मात्र तशी परवानगी न घेतल्याने वीज चोरी झाल्याचे महावितरणच्या अधिकारी कौस्तुभ वसावे यांनी सर्वांसमक्ष पंचनाम्यात कबूल केले मात्र आता सरकारी कार्यालयाचे वापरलेल्या विजेचे बिल कोण भरणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे यावेळी पारंपारिक मच्छिमार नेते आप्पा वांदरकर, राजन सुर्वे, दत्तगुरू कीर, रणजीत भाटकर, रत्नागिरी तालुका पारंपारिक मच्छिमार अध्यक्ष विशाल मूरकर यांच्यासह महिला आणि पुरूष मच्छिमार उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button