
राज्यातील वीजग्राहकांकडील थकबाकी सुमारे ६५ हजार कोटींवर गेली
राज्यातील वीजग्राहकांकडील थकबाकी सुमारे ६५ हजार कोटींवर गेली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे. वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाईसाठी विधी विभागाकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे.महावितरण कंपनीवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे थकबाकीदारांकडून वीजबिलांची वसुली करण्यात येत आहे. प्रसंगी त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. काही ठिकाणी थकबाकीदारांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण किंवा कार्यालयांमध्ये जाऊन तोडफोड केली जात आहे. अशा व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करण्यासाठी महावितरणकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
www.konkantoday.com