
चिपळुणातील दुषित पाणी प्रकरणी जार मालकांना अखेर धाडल्या नोटीसा.
जारमधून झालेल्या दूषित पाण्याच्या प्रकारामुळे आता नगर परिषदेने सर्वच जार मालकांना नोटीसा धाडल्या आहेत. त्यात कागदपत्रांची मागणी करण्यात आली असून लवकरच पथके सर्व प्रकल्पांची पाहणी करणार आहे.जारमधून होणार्या दूषित पाण्यामुळे काही महिन्यापूर्वी शहरातील गोवळकोटरोड येथील एका महिलेला अतिसाराचा त्रास झाल्याने तिने याची नगर परिषदेकडे तक्रार केली. ही घटना गांभीर्याने घेत अधिकार्यांनी संबंधित प्रकल्पाची तपासणी केल्यानंतर साठवण टाकी उघडी व फुटलेली असल्याचे दिसून आले.
टाकी तपासली असता त्यात प्रचंड प्रमाणात विष्ठा दिसून आल्या. तसेच अस्वच्छ विहिरीतून पाणी उचलले जात असून प्रकल्पात अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे संबंधित प्रकल्पाला नोटीस देत पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर संभाव्य सत्य टाळण्यासाठी उर्वरित २१ प्रकल्पांच्या मालकांनाही नोटीसा देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com