रिफायनरीला विरोध :गोवळ गावामधील सर्व्हे आणि माती परीक्षण रोखले, पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांचा आरोप

रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. राजापूर तालुक्यातील गोवळ गावामधील सर्व्हे आणि माती परीक्षण रोखण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ड्रोन आणि माती परीक्षणासाठी पोलिसांनी फौज फाटा तैनात केला आहे. परंतु,यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांनी आरोप केला आहे. राजापूर तालुक्यातील गोवळ गावात सर्व्हे करण्यात येणार आहे. परंतु, स्थानिकांनी या सर्व्हेला जोरदार विरोध केला आहे. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि सर्व्हे रोखण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व्हे रोखण्यात न आल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांकडून फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांची भूमिका पाहता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे. सर्व्हेला परवानगी नसताना कशाप्रकारे काम करता? असा सवाल स्थानिकांनी पोलिसांना केला असून यावरूनच पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. रिफायनरी विरोधकांनी ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण या विरोधात घेतलेला आंदोलनाचा निर्णय सध्या तात्पुरता मागे घेतलेला आहे. ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण करणाऱ्या कंपनीने राजापूर तालुक्यातील गोवळ गावच्या सड्यावर झालेला विरोध पाहता काम थांबवण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत किंवा प्रशासनाची याला परवानगी नसल्यास आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसणार असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
आंदोलनादरम्यान एक महिला जखमी झाली असून त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button