पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत सुरक्षाविषयक त्रुटींची समोर आलेली बाब अत्यंत चिंताजनक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंजाब दौऱयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत सुरक्षाविषयक त्रुटींची समोर आलेली बाब अत्यंत चिंताजनक असून या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पंतप्रधान हे एखाद्या पक्षाचे नसून देशाचे असतात याचे भान सगळय़ांनीच ठेवले पाहिजे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीची सुरक्षा हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे, सहजतेने घेण्याची ही बाब नव्हे. आपल्या देशाने सुरक्षेतील त्रुटींमुळेच याआधी दोन पंतप्रधान गमावले आहेत हे विसरून चालणार नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेतील त्रुटी ही चिंताजनक बाब असून या घटनेची जबाबदारी केंद्र आणि राज्यांनी एकमेकांवर न ढकलता नक्की काय घडले हे देशासमोर आणायला हवे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button