मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम धीम्यागतीने

मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचेच काम धीम्या गतीने सुरू आहे. कित्येक ठिकाणी खड्डे पडले असून प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आरवली ते संगमेश्वर दरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे काम जरी वेग घेत असले तरी संगमेश्वर बावनदीदरम्यान अद्याप काम ठप्प अवस्थेत आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम निर्धारित काळात पूर्णत्वास जाईल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

जवळपास एक दशकापूर्वी काम सुरू होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. प्रकल्पाचे काम वर्षानुवर्षे संथगतीने सुरू आहे. इतकेच नव्हे तर जागोजागी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येला वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या महामार्गाची अनेक ठिकाणी दैनावस्था होते. सर्व्हिस रोड अरुंद असल्याने नेहमीच वाहतूककोंडीचा फटका सहन करावा लागत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button