मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, रायगडावरून मोठी घोषणा


मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले. रायगडावरुन जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. राज्य सरकारने सगेसोयऱ्यांचा जो अध्यादेश (GR) काढला, त्याची तातडीने अंमलबजावणी करा, कारण कुणबी नोंद सापडलेल्या अद्याप प्रमाणपत्राचं वाटप सुरु करण्यात आलेलं नाही.
येत्या पंधरा दिवसात विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 31 जानेवारीपासून अंमलबाजवणी सुरु केली नाही तर 10 फेब्रुवारीपासून आंतरवली सर्राटीत आपण आमरण उपोषण करणार असल्याचं घोषणाही जरांगे पाटील यांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button