कोकण रेल्वेने रेल्वेतील फेरीवाल्यांचे पास ताबडतोब नुतनीकरण करून द्यावे -शौकत मुकादम

कोरोनाच्या काळामध्ये रेल्वेच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. आता त्या पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी-दिवा, सावंतवाडी-दिवा अशा अनेक गाड्यांमध्ये कॅन्टीनची व्यवस्था नाही. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रत्नागिरी ते रोहा, माणगांव काही फेरीवाल्यांना कोकण रेल्वेकडून पूर्वी पास देण्यात आले आहेत. त्या पासचे कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाकडून नूतनीकरण करण्यात आलेले नाही. पूर्वीपासूनचे जे पासधारक फेरीवाले आहेत, त्यांची आरोग्य तपासणी करून विक्री पास रेल्वेने नूतनीकरण करून द्यावे, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी प्रशासनाकडे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button