
साहेब, त्यांना वाचविण्यासाठी आमची काशी करू नका,चिपळुणातील बेधडक भूमिका मांडणार्या सौ. स्वाती खेडेकर-भोजने यानी पुन्हा मांडली व्यथा
साहेब कोल्हापूर, सांगलीला वाचविण्यासाठी आमची काशी करू नका. साहेब, तुम्ही महापूर आल्यानंतर आपण येथे आला होतात. तुम्ही सारी परिस्थिती पाहिली होती. त्यामुळे आमच्यावर उपोषणाला बसायची वेळ यायलाच नको होती. अशा शब्दात येथील पुरग्रस्त महिला सौ. स्वाती खेडेकर-भोजने यांनी चिपळूण दौऱ्यावर आलेल्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने काहीतरी करू, असे सांगितले होते पण त्यांनी काही केलेले नाही. साहेब तुम्ही आमचे कर्तेधर्ते आहात, तुम्हीच आता काहीतरी करा, खरं तर आम्हाला उपोषणाला बसायला लागण्याची वेळ यायला नको होती, कोल्हापूर, सांगलीला वाचविण्यासाठी आमची काशी करायला नको होती, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.
महापुरानंतर मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या दौर्यात खेडेकर-भोजने यांनी अशाच पद्धतीने आपला संताप व्यक्त केला होता. साहेब, आमचे काहीच राहिले नाही, आमदार, खासदार यांचा एक महिन्याचा पगार घ्या आणि चिपळूणला वाचवा असे त्यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. त्यांचा हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला होता, आता पुन्हा एकदा ना. उदय सामंत बचाव समितीच्या व्यासपीठावर आले होते तेव्हा त्यांनी अशाच पद्धतीने बेधडकपणे आपली भूमिका मांडली. www.konkantoday.com