अणूस्कुरा घाटात कोसळली दरड; अवजड वाहतूक बंद

राजापूर तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी असलेल्या अणूस्कुरा घाटात दरड कोसळल्याने घाटातून जाणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी सकाळी घाटात ही दरड कोसळून दगड व माती रस्त्यावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांच्यावतीने तत्काळ दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असून दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असे सांगण्यात आले आहे.

आंबा घाटातून वाहतुकीसाठी जड व अवजड वाहनांवर मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक वाहने अणूस्कुरा घाटाचा वापर करतात. परंतु येथेही दरड कोसळल्याने गैरसोय निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button