
अखेर ३७८दिवसांनंतर ऐतिहासिक शेतकरी आंदोलन संपले; शेतकरी घरी परतणार
नवी दिल्ली- केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३७८ दिवसांनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेतली ही बैठक आटोपल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
www.konkantoday.com