लोटे औद्योगिक क्षेत्रातून येणारे दूषित पाण्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ, शासनाकडे मदतीची मागणी

लोटे औद्योगिक क्षेत्रातून येणारे दूषित पाण्यामुळेमच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.खेड तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायत हद्दीतील भोई समाज हा वाशिष्ठी नदी किनारी वसलेला आहे. भोई समाजाचा उदरनिर्वाह हा मासेमारीवर अवलंबून आहे. परंतु हे गाव केमिकल झोनमध्ये येत आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रातून येणारे दूषित पाणी वाशिष्ठी नदीत सोडले जाते. त्यामुळे माशांची पैदास नष्ट झालेली आहे. त्यामुळे किनारी राहणारे भोई, खारवा आणि इतर सर्व समाज या नद्यांवर ते अवलंबून आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ असून शासनाने त्यांना मदत करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष रजनिकांत जाधव यांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button